मन...
मला खात्री आहे मनाच्या या प्रकारच्या खेळा मधून प्रत्येक मन जात.. जे नाही जात ते खूप सुदैवी आहेत असा म्हणेन मी.. नक्की काय वाटत आपलं आपल्यालाच काळत नसत.. कोणाची तरी वाट पाहत असत मन.. कोणाची ते नाही माहित... का ते पण नाही माहित.. कदाचित कधी कधी कोणीतरी आपल्या सोबत असावं याही पलीकडील काही भावना असतात.. शांततेतल्या सहवासाच्या... मन बहुदा त्याच शोधात असावं.. कधी पुन्हा थाऱ्यावर येणार मन हे माहित नसताना देखील मनाचा हाथ सोडवत नाही.. काय करायचं काही उमगत नाही.. शेवटी लिहायला बसले.. म्हंटल बघू लिहून तरी काही मिळत का ? काय करायचं या मनाचं.. फार टेन्शन देत कधी कधी.. नको नको तिथे जाऊन पोहचत ते हि एका क्षणात.. एक प्रसंग घडायची खोटी.. हे चाललं आपलं वाऱ्यासारखा विचाराच्या नदीत वाव्हत... काय गरज असते पण.. का आपल्याला याला वेसण बांधता येत नाही.. का आवरता येत नाही ह्याला.. नाही माहित... साध्या साध्या प्रसंगात सुद्धा किती विचित्र विचार करत हे.. आपल्याच आपल्या किळस वाटतो.. तरी नशीब मनाला आवाज नसतो.. नाहीतर जगायलाच नको होत कोणाला.. दुसर्याबद्दल वाईट विचार करणारे जगात राहिलेच नसते.. काय माह